HW News Marathi
महाराष्ट्र

घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे – नवनीत राणा 

अमरावती | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

विचार जमत नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा, असा सल्ला खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. आमच्यासाठी लोकांचा विकास महत्त्वाचा असून नाव बदल्याने विकास होत नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.दरम्यान, काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडत टीकास्त्र सोडलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस सर्वात बालीश: शरद पवार

News Desk

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये साचले पाणी

News Desk

उठसूठ शरद पवारांवर बोलणार्‍या गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

Manasi Devkar