HW News Marathi
Covid-19

नाशिक क्रिटीकल टप्प्यात,गांभीर्याने घेण्याची गरज

नाशिक | मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी कमी रुग्ण आढळून येण्यामागील कारणाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा केला आहे. “केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो,” असा सवाल उपस्थित केला आहे.

 

मुंबईत काल(७ जुलै) दिवसभरात ८०६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता आयसीएमआरनं लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर चाचण्यांचे अहवाल २४ तासात कसे येतील, हे सुनिश्चित केले पाहिजे. लक्षणं असलेल्या रूग्णांच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो. खाजगी रूग्णालयांकडूनही मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडेही राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,” अशी सूचना फडणवीस यांनी केली.

“नाशिक सध्या क्रिटीकल टप्प्यात आहे. त्यामुळे थोडं अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, प्रशासन काम करते आहे. पण, ते काम प्रत्यक्ष जमिनीवर पण दिसले पाहिजे. काल मुंबईत थोडे कमी म्हणजे ८०६ रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ ३३०० चाचण्या झाल्या आहेत. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

तसेच, पत्रकारांच्या सेवा या अत्यावश्यक सेवांमध्ये येतात. त्यांना सर्व त्या सोयीसवलती देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय केले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा पालकमंत्री जयंत पाटील सांगलीकरांसाठी ग्राऊंड झिरोवर…

swarit

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घट

News Desk

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे डॉ.दीपक म्हैसेकरांच्या सूचना

News Desk