HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यासह मुंबईतही पावसाचा जोर कायम, सखल भागात साचले पाणी

मुंबई | देशासह राज्यात देखील पावसाल सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने राज्यात जोर चांगलाच धरला आहे. काल (४ जुलै) चांगलाच जोर पकडलेल्या पावसाचा मुंबई आणि कोकण भागात असणारा जोर सलग दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रभर मुसळधार सुरु असणाऱ्या पावसामुळे आज (५ जुलै) सकाळच्या सुमारास मुंबई आणि इतर परिसरांमधील सखल भागात पाणी साचले आहे.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील गर्दी तुलनेने कमी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्याही बऱ्याच अंशी कमी असल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिवृष्टीमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोरदार पावसाने आठवड्याअखेरीस काहीशी संथ झालेली मुंबई पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच कोकण किनारपट्टी भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा-सचिन सावंत

News Desk

महिला व बालकांवरील अत्याचाराविरोधात राज्य सरकारकडून ‘शक्ती’ विधेयकाला मान्यता !

News Desk

भाजपची या ‘चिमण्यांनो परत फिरा’ची साद, आमदार बाळासाहेब सानप  प्रतिसाद देणार?

News Desk