HW News Marathi
महाराष्ट्र

जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही

मुंबई | सध्या महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी दिसत आहे. अशात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनाचं संकट या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. “कोरोनाचे संकट गहिरं आहे. पण केंद्रातून दररोज वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. प्लाझ्मा थेरपीबाबत संभ्रम आहे. लॉकडाऊन करायचं की अनलॉक करायचं? केंद्राने नीट गाईडलाईन बनवली नाही, त्यांनी राज्यांवर जबाबदारी ढकलली. त्यामुळे राज्य सरकारे आपआपल्या परीने निर्णय घेत आहेत”, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी टिव्ही ९ मराठी सोबत बोलताना केले.

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय कसा झाला याबाबत संभ्रम आहे. थेट महिनाभर लॉकडाऊन वाढवला. अनलॉक १, अनलॉक २ बाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते आणि अन्य पक्षाचे नेतेही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. जिथे रुग्ण वाढले तिथे लॉकडाऊन ठिक आहे, हा निर्णय कसा झाला याबाबत चर्चा होईल, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरीवर भाष्य केलं.

“मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही. मी सध्या मुख्यमंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. महत्त्वाच्या सूचना, सल्ला हवा असतो तेव्हा ते घेतात, प्रशासनाची पकड वगैरे काही योग्य नाही. प्रत्येकाची आपापली मतं असतात, कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं ही आपआपली मतं असतात.

जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा असतो. पण बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही. इतरांचे सल्ले घ्यायचे की नाही, प्रशासनाचं ऐकायचं की अन्य कुणाचा सल्ला घ्यायचा, राजकीय पुढाऱ्यांचा सल्ला घ्यायचा की राजकीय अनुभव असणाऱ्यांचा सल्ला घ्यायचा हे त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे” असे उत्तर तुम्ही मुख्यमंत्रिपदी असताना प्रशासनावर पकड होती, सध्याची परिस्थिती काय आहे, असा प्रश्न विचारला असता दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एससी-एसटी आयोगाचा मोठेगाव दौरा

News Desk

विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे महत्त्वाचे! – आदित्य ठाकरे

Aprna

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास सुरुवात

News Desk