HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांना २ तास दिले असते तर प्रश्न सुटले असते – चंद्रकांत पाटील

मुंबई | एकीकडे राज्यात कोरोना आहे तर दुसरीकडे राजकारणात अनेक गोष्टी घडत आहेत. अशात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महा वकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचे नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त २ तास मागितले असते तर त्यांनी २ तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, असे उद्गार त्यांनी काढले.

लॉकडाउन की अनलॉक अजून कळत नाही आहे. मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाउनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे अनलॉकमध्ये घालून ठेवले आहेत लोकांनी नेमकी काय करायचे? असाही प्रश्न देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला पाटलांनी विचारला आहे. मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीही संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दोन तास मागितले असते, पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो, असे टीकास्त्र भाजपने सरकारवर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

Aprna

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

News Desk

हार्दिक पटेल सेनेच्या जाहिर सभेत

News Desk