HW News Marathi
महाराष्ट्र

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

कल्याण | कल्याणमधील पत्री पुलाचे गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेत वाद सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

कल्याण शहरातील पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान लाँचिंग आहे का? अशा शब्दांत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.आमदार राजू पाटील म्हणाले, “पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झालाय. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाहीये. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली आजोळ आहे. त्यांनी इतर रखडलेल्या पुलांच्या कामातही लक्ष घातलं पाहिजे.”

“पत्री पुलाला जोडणाऱ्या 90 फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकत नाही. या रस्त्याच्या कामाचा जाब विचारायला मी आयुक्तांना भेटायला आलो होतो. मात्र त्यावेळी पोलिसांनी आमची अडकवणूक केली हे फार चुकीचं आहे.”कल्याणमधील पत्री पुलाचे गर्डर लॉचिंगचे काम कालपासून सुरु झाले. दोन दिवस लॉचिंगचे काम होणार आहे. या कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना नगरसेवक पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’, वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

News Desk

बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा !

swarit

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

Aprna