HW News Marathi
Covid-19

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचे आदेश

मुंबई | मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.

राज्यातील कोरोनाची स्थिती जरी नियंत्रणात असली तरी येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने या वर्षाअखेरपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत अचानक वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काहीच वेळात पालिका प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संथ लसीकरणामुळे डेल्टा विषाणूचा धोका कायम’

News Desk

“डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?”-भाजपचा सवाल

News Desk

संभाजीराजे काय गौप्यस्फोट करणार ? मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याचे दिले संकेत

News Desk