HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भेटीसाठी वारकरी आणि कोळी बांधव ‘कृष्णकुंज’वर!

मुंबई | कोरोनाच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे विविध क्षेत्रातील लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. तर राज ठाकरे यांनीही त्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. सोमवारी नाट्य क्षेत्रातील मराठी कलाकारांनी राज यांची भेट घेतली होती तर आज (११ नोव्हेंबर) कोळी बांधव, वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत.

सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. कार्तिकी एकादशीही जवळ आल्यानं पंढरपूर मंदिर सुरु करावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वारकरी आले होते. तर, राज ठाकरेंनीही वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकी दिली जात नाही, अशी तक्रार राज ठाकरेंकडे मांडली आहे. राज ठाकरेंकडे आमच्या समस्यांवर मार्ग नक्कीच मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं येणाऱ्या अडचणी त्यांनी राज यांच्यापुढं मांडल्या होत्या. तसंच, याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं व प्रसंगी आंदोलन करण्याचं आश्वासन राज यांनी दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : “हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं षडयंत्र, माझ्याकडे सगळे पुरावे”; रवी राणांचा गंभीर आरोप

Aprna

अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत !

swarit

माजी २ मुख्यमंत्र्याच्या गावी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपचं खिंडार

News Desk