HW News Marathi
Covid-19

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत अमित शहा यांची लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

नवी दिल्ली | देशात कोरोना चौथ्या टप्प्याचे लॉकडाऊन हा ३१ मेला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काल (२८ मे) बैठक घेतल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत अमित शहांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढवले तर त्यांची नवीन नियमावली काय असेल, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. येत्या ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशात लॉकडाऊन वाढवला जाणार की नाही, यावर स्पष्टीकरण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्प्याचे सर्व दावे खोटे असल्याचे स्पष्टीकरण गृह मंत्रालयाने दिले आहे.

देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकाता या ११ शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिलताची शक्यता कमी आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा, बाळासाहेब थोरातांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण टाळता आले असते !

News Desk

स्थलांतरित कामगारांना १५ दिवसात परत पाठवा – सर्वोच्च न्यायालय

News Desk