HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, अनिल परब यांचा विरोधकांना पलटवार

मुंबई | रिपब्लिक चॅनेलचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यापासून ते केंद्रातील भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.

“अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या‌ गुन्ह्यात‌ ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजपा करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव होतं‌, नाईक‌ कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर‌ त्यांना तपासाची ‌परवानगी दिली,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

“भाजप असं ओरडतंय‌‌ जणू काही तो पक्षाचा‌ कार्यकर्ता आहे. यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा‌ प्रश्न कुठे येतो, सुडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेला आरोप चुकीचा असून अर्णब गोस्वामीला भाजप नेते‌ का‌ वाचवत‌ आहेत?,” अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे. “अर्णब गोस्वामी यांना गुन्हेगार म्हणून अटक केलेली नाही, त्यांना तपासासाठी घेतलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्णब भाजपचा पोपट नाही, असे म्हटले होते. “अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही, पोपट तेच पाळतात”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय

Aprna

बाळासाहेब ठाकरे असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिलं असतं- राज ठाकरे

News Desk

‘राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करणार’

News Desk