HW News Marathi
Covid-19

२० लाख कोटी नव्हे हे तर प्रत्यक्षात फक्त १ लाख ८६ हजार ६५० कोटींचे पॅकेज !

मुंबई | कोरोनावर मात करण्यासाठी आणि या संकटाच्या काळातही संधी शोधून भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १०% असल्याचे देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. हे पॅकेज आपले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करेल, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक मोठे पाऊल ठरेल असा विश्वास पंतप्रधानांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारने आपल्या या आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा, असा सल्लाही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

“पंतप्रधानांनी जाहीर केलेले पॅकेज हे प्रत्यक्षात २० लाख कोटींचे नाही तर फक्त १ लाख ८६ हजार ६५० कोटींचे आहे. खरंच उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतील तर किमान १० लाख कोटींचे पॅकेज हवे. त्याचप्रमाणे, मोदी सरकारकडून हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १०% असल्याचा जो दावा करण्यात येतो आहे तो चुकीचा असून प्रत्यक्षात हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या केवळ ०.९१% इतकेच आहे”, असा दावा पी .चिदंबर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, या पॅकेजमध्ये देशातल्या गोरगरीब, स्थलांतरित मजुरांना, बेरोजगार कर्मचाऱ्यांना इ. अनेक घटकांच्या फायद्याची कोणतीही बाब मोदी सरकारच्या या आर्थिक पॅकेजमध्ये नसल्याचेही पी. चिदंबर यांनी सांगितले आहे. हे पॅकेज म्हणजे केवळ कर्ज आणि जुन्याच योजना नव्याने आणल्याचा प्रकार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित अशा या २० लाख कोटींच्या पॅकेजबाबत काँग्रेसने केलेल्या या सर्व दाव्यांमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे, हे पॅकेज भाजपच्या दाव्याप्रमाणे खरोखरच देशातील गोरगरीब जनतेला, मजुरांना उपयोगी ठरणार कि काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे निष्फळ ठरणार हे येणारी वेळच सांगेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्याची पातळी फार खालची असते, तिथपर्यंत आपण जायचं नाही !

News Desk

मोदींच्या आवाहनाला बळी पडून लाईट बंद करू नका ,उर्जामंत्र्यांचं आवाहन !

Arati More

‘धार्मिक आणि राजकीय गर्दीसाठी टाळण्यासाठी एकच धोरण ठेवा’, मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

News Desk