HW News Marathi
Covid-19

राहुल गांधींनी मानले पंतप्रधानांचे आभार!

नवी दिल्ली | कोरोनामुळे देशाच्या अनेक राज्यांत अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन सोडल्या गेल्या. तसेच, स्थलांतरित कामगारांना गावी गेल्यानंतर काम मिळावे यासाठी मनरेगा योजनेला सरकारने बळ देण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. शिवाय त्यांनी एक जुना व्हिडीओ पोस्ट करून मोदींना त्यांच्याच भाषणाची आठवणही करून दिली.

“घरी परतल्यानंतर या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी सरकारने मनरेगा योजनेसाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे,” असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. टि्वटमध्ये राहुल गांधी यांनी असे लिहिले आहे की, “यूपीएच्या काळात तयार झालेल्या मनरेगा योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४० हजार कोटींची तरदूत केली. मनरेगा योजनेचा फायदा आणि त्यातील दूरदृष्टी समजून घेतल्याबद्दल मोदी यांचे आभार मानतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता, डॉ. रणदीप गुलेरियांची माहिती

News Desk

बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk

देशात एका दिवसात ५२ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk