HW News Marathi
देश / विदेश

फास्टॅगच्या नियमावलीत केंद्र सरकारकडून बदल

नवी दिल्ली | केंद्र सरकारने टोल आकारणीसाठी मागील वर्षापासून एक नवा मार्ग शोधून काढला होता. मात्र, अनेकवेळा फास्टॅग स्कॅन न करणे, पुरेशी रक्कम नसणे असे प्रकार घडत होते. त्यामूळे टोल वाचवण्यासाठी जो खटाटोप केला होता त्याचा काही उपयोग झाला नव्हता. त्यामूळे केंद्र सरकारने नियमावलीत बदल केले आहेत.

केंद्र सरकारने बदललेल्या नियमामध्ये जर एखादा वाहनचालक त्याच्या वाहनाचा फास्टॅग योग्य प्रकारे काम करत नसेल किंवा त्यांमध्ये पैसे नसतील आणि तो जर फास्टॅग लेनमध्ये घुसला असेल तर त्याला टोलच्या दुप्पट दंड आकारला जाणार आहे. केंद्र सरकारने याची अधिसूचना १५ मेपासून देशभर लागू करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम परीक्षेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

News Desk

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी, मध्यस्थांमार्फत तोडगा नाही

News Desk

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

News Desk