HW News Marathi
Covid-19

पोलीस बांधवांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्याचे समजल्याने राज्यपाल व्यथित !

मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावत असताना पोलीस दलाती अनेक कर्मचारींनी आपले प्राण गमावले आहे. यात कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (१७ मे) या पोलीस योद्ध्यास श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीट करत, राज्यातील काही पोलीस बांधवांचा करोनाशी लढताना मृत्यू झाला असल्याचे समजून व्यथित झालो. या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, असे ते म्हणाले.

राज्यपाल, “गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही पोलीस बांधवांचा करोनाशी लढताना मृत्यू झाला असल्याचे समजून व्यथित झालो. देशासाठी कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो व आपल्या तीव्र शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो.”

राज्यात पोलीस दलातील आतापर्यंत १, २०६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सध्या ९१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत गेल्या २४ तासात, ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत २८३ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी  

News Desk

अरुण गवळींची मुलगी लॉकडाऊनमध्ये अडकणार लग्नाच्या बंधनात

News Desk

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार!

News Desk