HW News Marathi
Covid-19

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ९०० वर

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता थेट ३०, ००० पार गेला आहे. त्यातच आता मुंबई, पुण्यासह औरंगाबादमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाची चिंता चांगली वाढली आहे. औरंगाबाद शहरात आजच्या दिवशी (१६ मे) सकाळी ३० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुपारनंतर आणखी २८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा थेट ९०० वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे झालेल्या मृतांचा एकूण आकडाही २५ वर पोहोचला आहे. त्यामुळे, मुंबई-पुण्यासह आता औरंगाबादचीही चिंता चांगलीच वाढली आहे.

औरंगाबाद शहरातील एकट्या संजय नगर परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा देखील 106 वर पोहोचला आहे. औरंगबादमधील कोरोनाची स्थिती बघता शहरात पॅरामिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. शहरात कंटेन्मेंट झोनसह अन्यही परिसरात पॅरामिल्ट्री फोर्स तैनात असणार आहे. तर त्याचप्रमाणे लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी आता औरंगाबाद शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये गस्ती पथकाकडून दिवसातून २ वेळा रेड झोनमध्ये गस्त घालण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याने प्रशासनानाने अधिक दक्ष असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत १२,८८१ नवे रूग्ण आढळले

News Desk

देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, मुंबईत मात्र 30 वर्षांवरील नागरिकांचं होणार लसीकरण

News Desk

आता राज्यात लॉकडाऊन करायचा असल्यास केंद्राची परवानगी लागणार

News Desk