HW News Marathi
राजकारण

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

परळी | औष्णिक वीज निर्मितीमुळे भारताच्या नकाशावर ओळख असलेल्या परळी शहराची आता सौर ऊर्जा निर्मितीमुळे एक नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. तसेच या भागातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पूर्ण करेन असा विश्वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. २०१९ ला या भागाचा आमदार मीच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे ५०० कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या ८० मेगावॅट खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे उदघाटन आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते मात्र हवामान बदलामुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

Aprna

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

Chetan Kirdat

#Results2018 : चंद्रशेखर राव ५० हजार मतांनी विजयी

News Desk
राजकारण

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit

पालघर | पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पालघर येथे गुरुवारी (आज) झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगांचा पराभव झाला असला तरी शिवसेनेकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वनगा यांनाच जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.

पोटनिवडणुकी वेळी श्रीनिवास यांना फक्त १५ दिवस मिळाले होते, पण आता ८-९ महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही,असा आदेश उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास यांना दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीनंतरही लोकसभा स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले. आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, २०१९ चा हिरो तूच, असेही उद्धव यावेळी म्हणालेत. तसेच पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात देखील यावेळी करण्यात आली आहे.

‘साम दाम दंड भेद वाल्यांना श्रीनिवास यांनी घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन एवढी मते मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. सहा लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झाले. खिलाडूवृत्तीने हार स्वीकारावी लागते, पण मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो, असे उद्धव म्हणाले. मतदार मतदानासाठी रांगा लावून उभे होते परंतु त्यांना मशिन बंद दिसल्या. उन्हामुळे जर यंत्रे बंद पडत असतील, तर आधी का तपासणी केली नाही? आयोग म्हणून काय केले? पैसे पकडले, नावे सागितली, पण काहीच केले नाही. हेच शिवसैनिकांविरोधात घडले असते तर? हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांवर बंदी घातली होती, मग पैसे वाटले म्हणून काय केले असते? नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात? असे संतप्त सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले .

 

Related posts

आमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही !

News Desk

नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार! – मुख्यमंत्री

Aprna

निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट न पाहता दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या !

News Desk