HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील!

सोलापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१९ ऑक्टोबर) सोलापुरात पुर आलेल्या भागाची पाहणी केली. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगावला आहे. ‘देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधान ही बाहेर पडतील त्यांनी तिथेही जावे’,असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. “शेतकऱ्यांच्या मदतीवरुन राजकारणाचा चिखल कुणीही एकमेकांवर उडवू नये. विरोधी पक्षनेतेदेखील महाराष्ट्रातील जबाबदार नेते आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र आणि राज्य सरकार काय करेल यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात, त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर न पडण्याबाबत टीका केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं. असंही ते बिहारला जातच आहेत, दिल्लीतही जावं”, असे मिश्किल उत्तर देत खरमरीत टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

“शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची सुरुवात केलेली आहे. पण, केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. केंद्र सरकार हे पक्षाचं सरकार आहे. कदाचित ते पक्षाच्यादृष्टीने विचार करत असतील. पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फोन केला. त्यामुळे आमची खात्री पटली जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार नाहीत”, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना

Gauri Tilekar

कोल्हापुरात अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, मालोजीराजेही उपस्थित

News Desk

‘मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही’,सामनातून भाजपवर टीकेचे बाण

News Desk