HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांना केवळ निवडणूका दिसतात | नवाब मलिक

मुंबई | “मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणूका याव्यतिरिक्त काही दिसत नाही” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना नवाब मलिक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे, नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात झालेली पूरस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन झोपलेले होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे आहे. परंतु हे लोक दिल्लीत जाऊन बसतात”, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल | मुख्यमंत्री

“राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्ष सातत्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांच्या संपर्कात आहे. पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये एनडीआरएफच्या २ टीम दाखल झाल्या असून बारामतीमध्ये अजून एक टीम दाखल होणार आहे. या भागातील धरणांच्या विसर्गावरही राज्य सरकार लक्ष ठेवून आहे”, असे माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला व बालविकास मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा !

News Desk

“…हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो?”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Aprna

“पेडणेकरांचं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…”, किरीट सोमय्यांचं नवं ट्वीट

Manasi Devkar