HW News Marathi
Covid-19

मोदी सरकारने साखर उद्योगाला चालना देशासाठी पवारांनी सुचवले ‘हे’ पर्याय

मुंबई | कोरोनाच्या या संकट काळात राज्यात अनेक अडचणी निर्माण ‘झाल्या आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योगही अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. साखर उद्योगासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. साखर क्षेत्राला मदत करण्यासाठी सरकारला शरद पवारांनी पर्याय सुचवले आहेत.

शरद पवारांनी सुचवलेले पर्याय –

१-. २०१८-१९ आणि २०१९-२० पासून प्रलंबित असलेले निर्यात प्रोत्साहन भत्ते आणि बफर स्टॉक क्लिअरिंगच्या खर्चासाठी निधीची तरतूद.

२. साखरेचा किमान हमीभाव दर्जानुसार ३४५० ते ३७५० रुपयांच्या श्रेणीत वाढवा.

३. मागील दोन वर्षात गाळप केलेल्या ऊसाला सरासरी प्रतिटन ६५० रुपये अनुदानाची तरतूद.

४. मित्र समितीच्या शिफारशींच्या आधारे खेळत्या भांडवलाच्या थकबाकीचे अल्प मुदतीच्या कर्जात रुपांतरण आणि दोन वर्षांच्या अधिस्थगनासह किंवा व्याज सवलतीसह सर्व मुदतीच्या कर्जाचे दहा वर्षांसाठी रुपांतरण करा.

५. साखर कारखानदारांच्या डिस्टिलरीजना सामरिक व्यवसाय म्हणून मानले जावे, केंद्र सरकारतर्फे सन २०१८ मध्ये जाहीर केलेल्या व्याज सबवेशन कॅपेक्स योजने अंतर्गत मंजूर झालेल्या इथनॉल प्रकल्पांना स्टँड अलोन (एकल) तत्वावर बँकांनी वित्तपुरवठा करावा.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

आपलं गाव ‘कोरोनामुक्त गाव’ करा, मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

News Desk

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

News Desk