HW News Marathi
Covid-19

केंद्राच्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक

मुंबई | राज्यात आणि देशात कोरोनाची स्थिती ही बिकट होत चालली आहे. तासागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच देशाच्या आर्थिक तिजोरीला घट्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यावर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत टीका केली आहे.

केंद्राच्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक दिसून येतो. कृषिकर्ज वितरण, शेतमाल खरेदीसाठी निधी, सहकारी व ग्रामीण बॅंकांसाठी नाबार्डचा निधी या बाबी दरवर्षीच्या आहेत. मनरेगाची मजुरी यापूर्वीच वाढवली आहे. अशा घोषणा पॅकेजशी जोडून देशाची दिशाभूल सुरू आहे, अशा आशयाचे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाई भत्त्याला स्थगिती देण्यापेक्षा बुलेट ट्रेनच्या प्रकल्प रद्द का नाही केला?

News Desk

कल्याण-डोंबिवलीमध्ये ही लॉक डाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

News Desk

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणार, राजेश टोपेंची महत्वाची माहिती!

News Desk