HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री, शेलारांची कवितेतून राज्य सरकारवर टीका

मुंबई | महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाचा एक प्रस्ताव त्यांना माहिती नसताना काल (९ जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. बैठकीत रब्बी हंगामाचा गहू किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. या विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी हा प्रस्ताव न मांडता थेट सचिवांनी मांडायला सुरुवात केली. या प्रकरणारव भुजबळ यांनी अक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू दे मीच भुज”बळ”…मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!,” अशी कविता करत त्यांनी राज्य सरकावर टीका केली आहे.

या बैठकीत भुजबळ म्हणाले, “मी या विभागाचा मंत्री आहे की नाही? ते आधी/स्पष्ट करा मग हा प्रस्ताव मांडा,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भुजबळ यांच्या व्यतिरिक्त अन्य मंत्र्यांनीह यावर अक्षेप घेतला. मंत्र्यांना अंधारात ठेवून प्रस्ताव आणण्याची हिंमत होते कशी असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. सचिवांना कदाचित माहिती नसेल त्यामुळे असा प्रस्ताव आला असेल, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावमधील ‘कोरोना’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स !

News Desk

कोरोना वॉरियर्ससाठी पीपीई किट तयार करणारा भारत बनला दुसरा देश

News Desk

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी

News Desk