HW News Marathi
Covid-19

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ

मुंबई | देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतात. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररुपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होतो. पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा मंगळवारी केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याविषयी तीन दिवस विस्तृत माहिती देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परिस्थीती नियंत्रणात आली नाही तर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल – जयंत पाटील

News Desk

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ सुरुच

News Desk

…नाहीतर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध लावणार, ठाकरे सरकारचा नागरिकांना इशारा

News Desk