HW News Marathi
कृषी

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम शहरांमध्ये जावण्यास सुरुवात झाली आहे. मार्केटमधील भाजीपाल्यांची आवक घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने देशाच्या २२ राज्यातील शेतकऱ्यांनी १० दिवसीय संप पुकारला आहे. या संपाला १ जूनपासून सुरुवात झाली असून १० जूनपर्यंत शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे.

संपाच्या काळात शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे. परिणामी भाज्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपालाच्या गाड्या दाखल झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी संपाला व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला .

शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्थसंकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंद

News Desk

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या नियोजनाकडे लक्ष द्या – जिल्हाधिकारी डोंगरे

News Desk

स्वाभिमानीचे आंदोलन मागे, दुधाला मिळणार २५ रुपये दर

News Desk
देश / विदेश

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk

श्रीनगर | पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून भारतीय लष्कराचे कॅम्प आणि राजधानी दिल्लीवर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

काश्मीरमधील लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी गस्ती पथके, पोलीस, सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

तसेच राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दहशवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाणी हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकमधून घुसखोरी करणारे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबा दोन्ही संघटनांपैकी नक्की कोणत्या संघटनांचा हात असण्याची माहिती अद्याप गुप्तचर संघटनांना मिळाली नाही.

Related posts

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा निर्णय मंगळवारी होणार | सर्वोच्च न्यायालय

News Desk

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

swarit

आशियातील पहिली ‘यंगेस्ट आर्यन मॅन’ रविजा सिंगल

News Desk