HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

मुंबई | देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील विविध राज्यात अनेक मंजूर, कांमगार आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेनची देखील व्यवस्था केली. यातून हजारच्या संख्येने मंजूर त्यांच्या राज्यात पोहोचले. मात्र, देशभरात अजून काही लाखोच्या संख्यने मंजूर अडकले आहेत. ते पायी त्यांच्या राज्यात जात आहेत. यापार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेची विशेष सेवा आजपासून (१२ मे) टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.

रेल्वे वेळापत्रकानुसार, दिल्लीसाठी १५ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मंजुरांसाठी विशेष श्रमिक ट्रेन देखील धावणार आहे. यात आज मुंबईतून देशातील विविध राज्यांसाठी ५ श्रमिक गाड्या धावणार आहेत. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीसाठी विशेष रेल्वे रवाना होणार आहे.

तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीसाठी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. याची जय्यत तयारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर करण्यात आली. सोशल डिस्टिंसिंगसाठी स्टेशनवर ठिकठिकाणी मार्किंग करण्यात असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. तर पुण्यातून पुण्यातून येत्या ८ दिवसात २३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरांचल, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहे.

संबंधित बातम्या

४ वाजताच IRCTC वेबसाईट क्रॅश

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य – अजित पवार

News Desk

लोकसभा खासदार कपिल पाटील यांनाही कोरोनाची लागण

News Desk

चिंताजनक! देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

News Desk