HW News Marathi
महाराष्ट्र

बळीराजा आजपासून १० दिवसीय संप

मुंबई : देशाच्या २२ राज्यातील शेतकऱ्यांनी १० दिवसीय संप पुकारला आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने राज्यभरातील शेतकऱ्यांनी आजपासून १० जूनपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपा दरम्यान बळीराजा आपला कोणताही शेत माल विक्रीसाठी काढणार नाही.

शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून संपाला सुरुवात केली. तर पुणे-बंगलोर महामार्गावर राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रात्री शेतकरी संपाचा भाग म्हणून दुधाच्या टँकरमधून दूध रसत्यावर सोडून दिले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाची नदी वाहत असल्याचे चित्र दिसू लागले होते.

या संपात २२ राज्यातील १२८ शहरामधील महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. संपाच्या काळात शेतकरी आपला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरांमध्ये विक्रीस पाठविणार नाहीत. आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी देखील करणार नाहीत.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे, अशी माहिती जनआंदोलनाचे अॅड. कमल सावंत, प्रदीप बिलोरे, मकरंद जुनावणे आणि लक्ष्मण वंगे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

Koregaon Bhima Violence | पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ

Gauri Tilekar

वंचित बहुजन आघाडीकडून पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर  

News Desk
मुंबई

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

मुंबई | सर्वात जास्त वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांना आता अस्वच्छ स्थानकाचा दर्जा मिळाला आहे. भारतीय रेल्वेने ११ ते १७ मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईतील कल्याण, कर्ला आणि ठाणे अस्वच्छ रेल्वे स्थानक असल्याची नोंद झाली आहे.

भारतीय रेल्वेने दहा अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर केली. यात. अस्वच्छतेच्या यादीत कानपूर रेल्वे स्थानकाचा पहिला क्रमांक मिळाला आहे. या यादीत कल्याण तिस-या स्थानी, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या स्थानी आणि ठाणे हे आठव्या स्थानी आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात दिवसाला अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. या सर्वेक्षणा दरम्यान रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांच्या ट्रेन आणि स्थानकावरीस सुविधा सुधारण्यासाठी प्रवाशांकडून अभिप्राय मागितला होता. प्रवाशांच्या मोबाईल नंबरवर फोन करून त्यांच्या अभिप्राय मागविले होते.

प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या वेळी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून ट्रेन व स्थानकातील स्वच्छता, खाण्याची सोयी, एसी, अन्न-पदार्थ आणि ट्रेनमधील बिछीने अशा अनेक मुद्दयांवर अभिप्राय मागितला होता. त्या सर्वेक्षणानंतर अस्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली.

 

 

Related posts

शिवाजी पार्कवर रंगला महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा

News Desk

स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल

News Desk

विरोधकांचा सरकारविरोधात ३१ पासून जनआक्रोश

News Desk