HW News Marathi
महाराष्ट्र

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही – उर्जामंत्री 

मुंबई | १२ ऑक्टोबरला मुंबईसह राज्यातील काही भागात अचानक बत्ती गुल झाली होती. महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केले आहे.

“सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसंच या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर दुसरीकडे या घटनेची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यात मटक्याने पाय पसरले

swarit

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; वयाच्या ९३व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Aprna

‘अखेर पुणे शहरातल्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा’, दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत असतील सुरू!

News Desk