HW News Marathi
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकी नंतर घाईघाईने स्वीकारलेले मुख्यमंत्री पद अखेर येडियुरप्पांना शनिवारी सोडावे लागले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच येडियुरप्पांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मुंबईत पत्रकार परीषद घेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपावर सडकून टिका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत असे वक्तव्य चव्हाण यांनी पत्रकार परीषदेत केले.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आज विधानसभेत योग्य निर्णय झाला. भाजपाने आमदार फोडण्याचा जो प्रयत्न केला अशा प्रकारांना या निर्णयामुळे पुर्णपणे लगाम बसेल. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे घोडेबाजार होऊ शकला नाही. संख्याबळ नसाताना येडियुरप्पा आणि भाजपने जो प्रकार चालवला होता त्याला आज पुर्णपणे चपराक बसली आहे. असेही ते यावेळी पत्रकार परीषदेत चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपतीपदाच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब; देशाला मिळणार दुसरी महिला राष्ट्रपती

Aprna

आता सुज्ञ जनता राष्ट्रवादीसारख्या बुडत्या पक्षाला आधार देणार नाही !

News Desk

चले जाओ मोदी

News Desk
राजकारण

राम कदमांचे प्रवक्तेपद जाणार ?

News Desk

मुंबई । दहीकाला उत्सवादरम्यान भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी स्रियांविषयी केले बेताल वक्तव्य त्यांना भोवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राम कदम हे भाजपचे प्रवक्ते म्हणून अनेक वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवितात. परंतु त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपकडून आता त्यांचे प्रवक्तेपद काढून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली, त्यांचा तीव्र निषेधही व्यक्त केला गेला. तसेच त्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली असली तरी त्यांनी त्यांची चूक कबूल न केल्यामुळे देखील त्यांच्यावर टीका झाली. आता भाजपने देखील राम कदम यांना कोणत्याही वृत्तवाहिनीमध्ये प्रवक्ते म्हणून जाऊ नये, अशी सूचना केली आहे.

Related posts

…तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?

News Desk

लोकशाहीच्या नावाने असे करणे बरे नाही !

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

Gauri Tilekar