HW News Marathi
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई | कर्नाटक विधानसभा निवडणुकी नंतर घाईघाईने स्वीकारलेले मुख्यमंत्री पद अखेर येडियुरप्पांना शनिवारी सोडावे लागले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच येडियुरप्पांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मुंबईत पत्रकार परीषद घेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपावर सडकून टिका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत असे वक्तव्य चव्हाण यांनी पत्रकार परीषदेत केले.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने आज विधानसभेत योग्य निर्णय झाला. भाजपाने आमदार फोडण्याचा जो प्रयत्न केला अशा प्रकारांना या निर्णयामुळे पुर्णपणे लगाम बसेल. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे घोडेबाजार होऊ शकला नाही. संख्याबळ नसाताना येडियुरप्पा आणि भाजपने जो प्रकार चालवला होता त्याला आज पुर्णपणे चपराक बसली आहे. असेही ते यावेळी पत्रकार परीषदेत चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने जैन समाजाचा केलेला अपमान विसरू नका !

News Desk

मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव !

News Desk

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna