HW News Marathi
राजकारण

मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही

मुंबई | २०१९ च्या निवडणुकीला फक्त एक वर्ष बाकी आहे. त्याआधी काही स्थानिक निवडणुकाही होतील. आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने सरकारला फार विकासकामे करता येणार नाहीत, म्हणूनच राज्य मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची इच्छा नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

खडसे यांना पुण्यातील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागला होता. या महिन्याच्या सुरूवातीला भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तन यात्रे’ला सुरुवात

News Desk

आठवलेंची आबा बागुल यांना ऑफर

swarit

काँग्रेसची ‘ठगमास्टर’ नावाने नवीन मोहीम

News Desk
राजकारण

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान मोदींनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी. आपल्या वागणुकीतून त्यांनी सर्वांसमोर एक चांगले उदाहरण तयार करायला हवे. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी’, असा खोचक सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना दिला आहे. ते माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

‘यूपीए सरकारच्या काळात भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मी कधीही भेदभाव केला नाही. मी पंतप्रधान असताना जेव्हा भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांचा दौरा करायचो तेव्हा माझे भाजपच्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान देखील ही गोष्ट मान्य करतील”, असेही मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सध्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींकडून विरोधकांवर टीका करताना टोकाची भाषा वापरली जात असून मनमोहन सिंग यांनी दिलेला हा सल्ला याच संदर्भाने असू शकतो, असे म्हटले जात आहे.

Related posts

राज्यातील तरुणाईच्या जोरावर आम्ही पुन्हा स्वराज्य स्थापन करणार !

Gauri Tilekar

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

News Desk

मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार | राधाकृष्ण विखे पाटील

News Desk