HW News Marathi
देश / विदेश

“१०% आरक्षणच हवं होतं तर मग मोर्चे आणि बलिदान का दिलं ?”, संभाजीराजेंचा सवाल

मुंबई । “मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली भूमिका ही माझी एकट्याची नाही तर सकल मराठा समाजाची आहे. १० टक्के आरक्षणच हवं होतं तर मग मोर्चे आणि बलिदान का दिलं ?”, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, समाजात वाढणाऱ्या जातीय विषमतेबाबत देखील खासदार संभाजीराजेंनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, “राज्यात पुन्हा एकदा शिवशाहू यात्रा काढू”, अशी इच्छाही संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.

मराठा समाजाला संबोधित करताना यावेळी संभाजीराजेंनी असा सवाल उपस्थित केला की, “EWS आरक्षण स्वीकारण्यास तयार असणारे ‘मराठा समाजाचं त्यामुळे नुकसान होणार नाही’ असे समजाला लिहून देणार आहेत का?” त्याचप्रमाणे, “दक्षिण दिग्विजयला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटगावच्या मौनी महाराज मठात आशीर्वाद घेतला होता. तसाच आशीर्वाद मी आज मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी घेतला आणि एक वेगळीच ताकद मिळाली”, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (३ ऑक्टोबर) कोल्हापुरातील पाटगाव इथे सकल मराठा समाजातर्फे संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, संभाजीराजेंनी पाटगाव येथील माऊली महाराज मठाचे दर्शन घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

News Desk

आज राम मंदिराबाबत सुनावणी

News Desk

#IndependenceDay : सरकारचा दबावही नसावा अन् अभावही नसावा !

News Desk