HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसेवा परीक्षा आणि सर्व भर्ती प्रक्रिया पुढे ढकलण्याची संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

मुंबई | मराठा आरक्षणाचा तिढा सुटता सुटत नाही आहे. अशात १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक मराठा समाजाने दिली आहे. या सगळ्यात आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा परीक्षा आणि सर्वच भर्ती प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, सर्वच जातींतील मुलांची सरसकट वयाची अट २ वर्षाने वाढवावी, असेही या पत्रात नमूद केले आहे.

खेडेगावातील तरुणांना गेल्या अनेक महिन्यांपासून शहरापासून लांब राहावे लागत आहे. त्यांना व्यवस्थित अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. अशा तक्रारी सर्व समाजातील तरुणांनी करायला सुरुवात केली आहे. मराठा समाजच्या तरुणांची मानसिकता तर उद्विग्न आहे. या सर्व पार्श्वभूमिवर या परीक्षा पुढे ढकल्याव्या अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल डिझेलवर सेस वाढवून केंद्र सरकारने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले ! नाना पटोले

News Desk

बाजार सुरू करू शकता मग कांदा निर्यात बंदी का? शरद पवारांचा केंद्राला सवाल

News Desk

कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार? पूरपरिस्थितीच्या सुटकेसाठी नेव्ही,आर्मी सज्ज..!

News Desk