HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींनी इथेनॉल निर्मिती करावी, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२ ऑक्टोबर) पुण्यात प्रसारमाध्यमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल निर्मिती करावी असे आवाहन शरद पवारांनी मोदींना केले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाचा अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

“यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढले, त्यामुळे यावेळी आणि पुढील वर्षी या ऊसाचं गाळप कसे करायचे हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के साखर उत्पन्न कमी करुन त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आहे. केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण अनुकूल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाला अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबत आम्हा लोकांची नाराजी आहे. आमच्या पेक्षाही पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जास्त नाराजी आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार जे सांगतंय की आम्ही बाजारपेठ खुली केलीये यामध्ये काही विशेष नाही. पण केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण याच्या उलट आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावरून आशिष शेलारांचा काँग्रेसला टोला!

News Desk

शिवसेनेची ताकद कमी होतेय, सिंधुदुर्गातील जनता आता शिवसेनेला साथ देणार नाही !

News Desk

पवार परिवाराशी संबंधित पारनेर कारखाना घोटाळाप्रकरणी लवकरच कारवाई सुरू होणार – सोमय्या

News Desk