HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सायबर कमिटी

मुंबई | सोशल मीडियावर महिलांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्लील वक्तव्ये अथवा टिपणी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सायबर समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या या सायबर कमिचीमध्ये महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, मुंबई पोलीस उपायुक्त डॉ रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटीबाबत अनुभव असलेले वकील ऍड प्रशांत माळी, ऍड वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत काम करणाऱ्या श्रीमती सोनाली पाटणकर, मुक्त पत्रकार आणि लेखिका मुक्ता चैतन्य यांचा समावेश आहे. तसेच अजुन काही पोलिस अधिकारी व मान्यवरांचा ही समावेश असणार आहे.

या समितीची पहिली बैठक महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ८ मे रोजी होणार आहे. सामाजिक माध्यमाद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला तसेच महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत.

याबाबत बॊलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या कि, जाहीर अवमानकारक टिप्पणीचा महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते तेव्हा अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. म्हणून तज्ञ् व्यक्तींचा समावेश असलेली समिती आयोगाने स्थापन केली असून यासंदर्भात समितीकडून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सादर केला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विश्वजीत कदमांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Gauri Tilekar

छगन भुजबळांचा पाय आणखीनच खोलात

News Desk

धनंजय मुंडे आणि माझ्यात गैर काही झालंच नाही, रेणू शर्माचा खुलासा

News Desk
देश / विदेश

एडीआर रिपोर्टनुसार भाजपच्या २२४ पैकी ८३ उमेदवारांवर गुन्हे दाखल

swarit

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगलेली दिसत आहे. गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचा पहिला क्रमांक लागतो. भाजपच्या २२४ उमेदावारांमधील ८३ उमेदावारांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे ही संख्या भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी ३७ टक्के आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिपोर्टने (एडीआर) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून एडीआरने कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या पार्श्वभूमी दिली आहे. उमेदवारांवरील गुन्हे, संपत्ती, शिक्षण इत्यादी गोष्टींची आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात एकूण २ हजार ५६० उमेदवार उतरले आहेत. यापैकी ३९१ उमेदवारांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच, कर्नाटकमधील निवडणुकीत नशीब आजमावू पाहणाऱ्या उमेदवारांपैकी १५ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी एडीआरची आकडेवारी सांगते.

गुन्हेगारी उमेदवारांची आकडेवारी

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले उमेदावर – २५४

हत्येसंबंधी गुन्हे दाखल असलेले उमेदावर – ४

हत्या करण्याचे प्रयत्न करण्यासंबंधी गुन्हे दाखल असलेले उमेदावर – २५

महिलांवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल असलेले उमेदावर – २३

गुन्हे दाखल असलेले उमेदवार

भाजप २२४ – ८३ (३७ टक्के)

काँग्रेस २२० – ५९ (२७ टक्के)

जेडीएस (१९९) – ४९ (२१ टक्के)

जेडीयू (२५) – ५ (२० टक्के)

आप (२७) – ५ (१९ टक्के)

Related posts

राहुलच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर मायावतीने पाणी फेरले

swarit

भाजपमुक्त गुजरात करणार – युवा नेता हार्दिक पटेलची गर्जना

News Desk

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली

News Desk