HW News Marathi
महाराष्ट्र

विश्वजीत कदमांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महापुरामुळे सांगली शहर व जिल्ह्यातील कडेगाव-पलूस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्‍कम पुनर्वसनासाठी लागेल. राज्य सरकारने ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते, आमदार विश्‍वजीत कदम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.कदम यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

त्यांनी यासंदर्भात आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट लिहीली आहे ,या पोस्टमध्ये ते म्हणतात की,

आज सकाळी मुंबईत राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व सांगलीतील ,विशेषत: माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातील पुरग्रस्त भागाच्या विदारक स्थिती बद्दल छायाचित्रे व व्हिडीओ च्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. तसेच प्रभावी मदतकार्याबद्दल मी तयार केलेला आराखडा सादर केला.

शासनाने जाहीर केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून मिळावी, शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी व्हावी. शेतमजूर , व्यापारी याना आर्थिक सहाय्य केले जावे , ज्यांच्या पशुधनाची वा राहत्या घराची हानी झाली आहे अशांना मदत मिळावी, शाळांची दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठयपुस्तके मोफत मिळावीत आदी १५ प्रमुख मागण्या केल्या

कदम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पलूस-कडेगाव मतदारसंघातील पुरग्रस्त भागाची विदारक स्थितीची माहिती, छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून दिली. पुनर्वसनासाठी कदम यांनी तयार केलेला आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला. पुनर्वसनाबरोबरच त्वरित कर्जमाफी व्हावी, शेतमजूर तसेच व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे, ज्यांच्या पशुधनाची वा राहत्या घराची हानी झाली आहे अशांना मदत मिळावी, शाळांची तातडीने दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठयपुस्तके मोफत मिळावीत आदी 15 प्रमुख मागण्या कदम यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये भाजपला धक्का ! ५० महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

भाजपकडून विधान परिषदेसाठी डच्चू ; तर पंकजा मुंडे म्हणतात…

News Desk

फडणवीसांनी खालच्या स्तरावर राजकारण केलं, खडसेंचा गंभीर आरोप

News Desk