HW News Marathi
Uncategorized

एल व एन विभागातील नागरीकांनी पाणी उकळून प्यावे- पालिका

मुंबई : येत्या सात दिवसात एल आणि एन वॉर्ड मधील लोकांनी पाणी उकळून पिण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही सूचना जारी केली आहे. घाटकोपर जलाशयाच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलाशय ७ मे पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होणार आहे.

विशेषतः बीएमसीच्या एल आणि एन या विभागांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच प्रामुख्याने कुर्ला आणि घाटकोपर भागातील नागरिकांनी येत्या ७ तारखेपासून पुढचा आठवडाभर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर!

News Desk

नाशिकमध्ये एसटी रिक्षा-बसचा भीषण अपघात, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

News Desk

धक्कादायक, स्वताच्या मुलीसह 140 महिलांवर 1000 वेळा बलात्कार , केलेल्या क्रूरकर्माचा हिशोब डायरीत नोंद

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

News Desk

आंध्रप्रदेशातून अपहरण केलेल्या व्यक्तींची उस्मानाबाद पोलिसांकडून यशस्वी सुटका

Aprna

चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

News Desk