HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, भाजपचा खटाटोप सुरू | जयंत पाटील

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहेत, असा आरोप जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. जयंत पाटील यांनी एक वृत्त पत्रात बातमीमधून ही माहिती मिळाली आहे. यात जयंत पाटील म्हणाले, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२८ एप्रिल) राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या निवेदना त्यांनी राज्यात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असे भाजपला वाटत असून त्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये माध्यमांची गळचेपी सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार, विनंतीनुसार आणि मनाप्रमाणे वागतात असे आमचे आजही मत नाही. राज्यपाल हे स्वतंत्र विचाराचे आहेत. ते निर्भीडही आहेत. त्यामुळे याप्रश्नी ते निर्भीडपणे निर्णय घेतील, असा विश्वास असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

L6 आणि L8 परवाने असलेली मद्यविक्री दुकाने सुरु करण्यास दिल्लीत परवानगी

News Desk

कोरोनाची लागण अथवा मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांचे मिळणार विमा कवच !

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

Arati More