HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज काय ?

मुंबई | “आता काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज काय ?”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

“येत्या विधानसभेत विरोधी पक्ष हा ‘वंचित बहुजन आघाडी’ असेल. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही”, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. त्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि, “लोकसभेपासून वंचितला भाजपचा छुपा पाठिंबा होता. आता विधानसभेतही असेल. आता मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे”, असा टोला चव्हाण यांनी लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि, “आता काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज काय ?”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील टीका केली आहे. “बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर टीका केली आहे. मात्र, आम्ही आरशात नाही तर जनतेच्या चेहऱ्याकडे पाहतो. जे दडले आहे ते तेथे दिसते. त्यामुळे आता आरशात पाहण्याची वेळ कोणावर आली आहे हे थोरातांनी समजून घेण्याची गरज आहे”, अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे !

News Desk

जेएनयू हिंसेच्या निषेधार्थ सुरू असलेले आझाद मैदानावरील आंदोलन मागे

swarit

आज भाजपची पहिली यादी जाहीर होणार ?

News Desk