HW News Marathi
महाराष्ट्र

बाबरी मशिदचा निर्णय देशहिताचा नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई | बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय आज (३० सप्टेंबर) उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयानं दिला. बाबरी मशिद विध्वंस प्रकरणाच्या खटल्यात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. पण, सदर निर्णय़ देशहिताचा नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही.लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

Aprna

“पाडून दाखवा सरकार” हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?” – शेलारांचा टोला

News Desk

‘चोराच्या उलट्या बोंबा’, नाना पटोलेंचा विरोधी पक्षाला टोला

News Desk