HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्र दिनी निघणार कामगारांचा आझाद मैदानात एल्गार मार्च

मुंबई | आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी आझाद मैदानावर सुमारे ५० हजार कामगार धडक देतील, असा दावा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने केला आहे. कामगार कायद्यांत कामगारविरोधी बदल आणि किमान वेतनाची मागणी करत सर्वपक्षीय कामगार संघटनांनी सरकारविरोधात एल्गार मार्चची हाक दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीने सरकारवर टीका केली.

पालिका, बेस्ट-एसटी यांचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यात कंत्राटवर तरुणांना कामावर ठेऊन कमी पगारात जास्त वेळ काम करुन घेतात. या कंत्राटी कामगारांना सुद्धा वेळेवर पगार दिला जावा, असे या संघटनाची भूमिका असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, म्युनिसिपल कामगार, बेस्ट-एसटी कामगार, शिक्षक, प्राध्यापक सरकारी कर्मचारी संघटना अशा ३५ कामगार संघटना या एल्गार मोर्चात सामील होणार आहे.

कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले की, नाशिकमधील राज्य परिषदेत कामगारांचा एल्गार मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एल्गार मोर्चामध्ये संघटित व असंघटित कामगारांच्या विविध संघटना सामील होणार आहेत. मात्र भाजपा प्रणीत भारतीय मजदूर संघाने या मोर्चातून अंग काढून घेतले आहे. तरीही या एल्गार मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हजर राहून कामगारांना सामाजिक सुरक्षेचे आश्वासन द्यावे. नाहीतर आगामी निवडणुकीत सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यास कामगार भाग पाडतील, असा इशाराही उटगी यांनी या वेळी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

Aprna

कँन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा

News Desk