HW News Marathi
देश / विदेश

आसारामला जन्मठेप | अन्य दोघांना 20-20 वर्षे शिक्षा

जोधपूर | अल्पवयीन मुलीवरील बलात्कारा प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसारामबापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूरच्या SC आणि ST न्यायालायने ही शिक्षा ठोठावली आहे.

याप्रकरणात न्यायालयाने हॉस्टल वॉर्डन शिल्पा व हॉस्टल डायरेक्टर शरद यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयामध्ये आसारामला रडू कोसळले. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना बलात्कार प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

आसाराम बापू हे गेल्या पाच वर्षापासून जोधपूर तुरुंगाची हवा खात आहेत. आसाराम भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केले होते. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांच्या पत्राची दखल!

News Desk

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

News Desk

ममता बॅनर्जींनी तालिबानशी केली भाजपची तुलना; म्हणाल्या…

News Desk
महाराष्ट्र

देशाला अच्छे दिन येतील, असे वाटत नाही | उद्धव ठाकरे

News Desk

गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा, असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या ‘देशाला अच्छे दिन’ येतील असे वाटत नाही, असा टोला लगावतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या झाली आहे. गुन्हे रोखण्यात देवेंद्र फडणवीस सरकारला सपशेल अपयश आलं आहे.

हे सरकार बिनकामाचे असून हे नाकर्त्यांचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा असाच वाढत गेला तर शिवसैनिक कायदा हातात घेतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज नगरला भेट दिली. यावेळी त्यांनी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बिनकामाचे आहे. राज्याची अवस्था बिहारपेक्षाही वाईट असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्री दिला पाहिजे, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Related posts

सुशांत प्रकरणी सीबीआय पुढील तपासणीसाठी आज मुंबईत दाखल होणार

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य

Aprna

विधानसभा, विधानपरिषदेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

Aprna