HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाबाधितांची संख्या २१ हजाराहून अधिक, तर आतातपर्यंत ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली | देशात कोरोनाच रुग्णांची संख्या २१ हजार ३९३ वर पोहोचली आहे. देशातील सर्व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात आतापर्यंत ४ हजार २५७ जण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर देशात ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या जास्त असून देशात दुसरा क्रमांक वर आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण ५,६४९ रुग्णांनीन रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांक तर गुजरातमध्ये २,४०७ इतके रुग्णांनी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मालेगाव आणि नागपूर हे कोरोनाचे हॉस्टपॉट बनले आहे. तसेच गुजरामधीलअहमदाबाद या शहरांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. काल (२२ एप्रिल) राजस्थानात १५३, उत्तर प्रदेशात १०१ आणि दिल्लीत ९२ नवे रुग्ण आढळले.

पंतप्रधान मोदी २७ एप्रिला देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोत चर्चा करणार

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या पाश्वभूमीवरपंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत २७ एप्रिलला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधणार आहे. गेल्या महिनाभरात पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत अशी तिसरी बैठक असणार आहे. या बैठकीनंतर देशातील सर्व राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आढवा घेऊन देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवा यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तो मान्यच, पण….! । अमृता फडणवीस

News Desk

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसींचा साठा कमी पडला नसता !

News Desk

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत अमित शहा यांची लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

News Desk