HW News Marathi
Covid-19

कस्तुरबाने कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त करण्यात गाठली ‘शंभरी’

मुंबई | राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या ही मुंबईत आहे. आणि या बाधितांवर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज (२१ एप्रिल) कस्तुरबा रुग्णालयातून १०० वा कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन घरी गेला. संपूर्ण आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय सगळेच जण करत असलेल्या अथक परिश्रमांचेच हे फळ आहे.

मुंबईत जेव्हा कोरोनाने शिरकाव केला तेव्हापासून या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, सगळेच जण जीवाची बाजी लावूया या रुग्णांवर उपचार करत आहेत. आणि आज कस्तुरबातून कोरोनाचा शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला. आत्तापर्यंत कस्तुरबातून कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये ६० पुरुष आणि ४० महिलांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

“विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांबाबत निर्णय कधी घेणार आहात ?”

News Desk