HW News Marathi
Covid-19

 मुंबईतील झोपडपट्ट्यांना आर्किटेक्ट आणि विकासक जबादार, रतन टाटांची टीका

मुंबई | मुंबईतील झोपडपट्ट्यांना येथील आर्किटेक्ट आणि विकासक जबाबदार असल्याची टीका उद्योगपती रतन टाटा यांनी केली. मुंबईत झोपडपट्टी उभारली जात आहे. या झोपपट्टीती लोकांना योग्य वातावरण मिळत नाही. यामुळे शहराचे वातावरण बिघडले जात असून शहर बांधकाम व्यावसायिकांना झोपडपट्ट्या तयार करताना थोडी लाज वाटली पाहिजे, असे परखड मत रतन टाटा यांनी मांडले.

जगभरातील कॉर्पोरेट आणि स्टार्टअप व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या काॅर्पजिनीतर्फे आयोजित वर्च्युअल परिसंवादात काल (२० एप्रिल) पार पडला. या परिसंवादात बोलताना रतन टाटा म्हणाले की, वास्तुरचनाकार आणि विकासक म्हणून आपल्यावर सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे शहरातील उंच झोपडपट्टी उभारताना लाज वाटली पाहिजे असेही टाटा यांनी म्हटले आहे.

देशातील कोरोनाविरुद्धच्या लढईत रतन टाटा आणि टाटा समूहाने सरकारला १५०० कोटींची मदत केली आहे. त्याशिवाय करोनाच्या लढाईत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना आपली पंचतारांकीत हॉटेल्स खुली केली आहेत. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी लॉकडाऊनच्या काळात संपत आहे, त्यांच्यासाठी टाटा मोटर्सने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुमच्या वाहनाची वॉरंटी ३ मे रोजीही संपत असेल तरी तुम्हाला अतिरिक्त दोन महिन्यांची वाढ मिळेल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि राजेश टोपे इन अ‍ॅक्शन मोड, दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा करणार दौरा

News Desk

न्यूझीलंडने अशी केली कोरोनावर यशस्वी मात

News Desk

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे, कंगना राणावतचा नवा शोध

News Desk