HW News Marathi
महाराष्ट्र

आज पुन्हा भारत बंद

दलित संघटनांनी २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंद नंतर मंगळवार १० एप्रिल रोजी पुन्हा एकदा काही दलित संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. २ एप्रिल रोजी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले होते त्याच्या निशेधार्थ पुन्हा दलित संघटनांकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

या बंद दरम्यान कोणत्याही प्रकारच्या हिंसक घटना घडू नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विषेश काळजी घेण्यात आली आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये संवेदनशील जागांवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

विषेश म्हणजे २ एप्रिल रोजी ज्या ठिकाणी बंदला हिंसक वळण प्राप्त झाले होते तिथे विषेश सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे. दरम्यान कोणत्याही राज्यात बंदला हिंसक वळण प्राप्त झाल्यास त्याला त्या विभागाचे जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक जबाबदार असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं – संदीप देशपांडे

News Desk

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

News Desk

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

News Desk