HW News Marathi
मुंबई

रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी अंधारात

मुंबई | वरळीची माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी गेल्या महिनाभरापासून अंधारात आहे. या ठिकाणी विजेच्या दिव्यांची सोय नसल्यामुळे गेल्या महिनाभरापासून लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी पुरता प्रकाश मिळत नसल्यामुळे लोकांना मोबाईल टॉर्च च्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

या समस्येला त्रासलेले वरळीर सध्या स्मशानभूमीत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. सध्या या स्मशानभूमीचा वापर वरळी कोळीवाडा ते प्रभादेवी, डिलाईल रोड ते दिपक टॉकीज परिसरात रहाणारे रहिवाशी करतात. या ठीकाणी असलेले तीनही लाईटचे पोल बंद आहेत काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसात हे विजेचा प्रवाह बंद असल्याचे पहायला मिळत आहे. या बाबत महापालिकेकडे तक्रार करुनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी मोबाईल टॉर्च च्या उजेडात लोकांना अंत्यसंस्कार करावे लागतात ही बाब अत्यंत वाईट आहे.

विज नसल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वीद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यात यावा. आठमहिन्यापूर्वी स्मशानभूमीत प्रकाश पडावा अशा लाईटची सोय स्मशानभूमीत करण्यात आली होती. प्रशांत सकपाळे तेव्हा जी साऊथ ला सहायक आयुक्त होते. सध्या विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे कारण या पोलला विद्युत पुरवठा करणारी केबल ब्रेक झाली आहे.

परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या समस्येला वरळीकरांना सामोरे जावे लागत आहे. येत्या २ दिवसात जर विजेचे दिवे सुरु झाले नाहीत आणि विद्युत पुरवठा सुरळीत सुरु झाला नाही तर शिवसेना आंदोलन करेल असा इशारा वरळी विधानसभेचे युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटिल यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणाचा विषय म्हणजे अशी आग, की त्यामुळे हात जळतील | रामदेव बाबा

News Desk

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

News Desk

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा पालिकेत धिंगाणा

News Desk