HW News Marathi
महाराष्ट्र

तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे राज्यातील उस्मानाबाद जिल्हा झाला ‘कोरोनामुक्त’

उस्मानाबाद | कोरोनाचा संसर्ग राज्यात वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात काल (१९ एप्रिल) कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४२००वर पोहोचली आहे. एका बाजुला राज्यातील रुग्णांची संख्या वाढते तर दुसरीकडे राज्यातील उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यातील तीन कोरोनाबाधित रुग्णाचे उपचारानंतरचे शेवटचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने आता उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबादमध्ये ३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ८५ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांची चाचणी रिपोर्ट निगेटिव्ही आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन कोरोना रुग्णांचे शेवटचे रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनातर्फे देखील उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश आता ग्रीन झोन यादीत झाला आहे. गेल्या १९ दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात एकही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आधुनिक रँडला निवडणुकीत जनताच धडा शिकवेल”निर्बंधांवरुन संदीप देशपांडेंची मुख्यमंत्र्यावर टीका!

News Desk

औरंगाबादमध्ये MIM ला मोठा झटका, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

#CoronaVirus : केंद्राने राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीने चाचणीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री

swarit