HW News Marathi
महाराष्ट्र

चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण

पुणे | मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी चाकणमध्ये हिंसक मार्ग स्वीकारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चाकणमध्ये आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी संतप्त होऊन २५-३० बसेस जाळल्या. त्यामुळे चाकण पोलिसांनी जमावबंदी सुरु केली आहे.

चाकणमधील मोर्च्यात आक्रमक मोर्चेकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून तर धरलाच, शिवाय समोर येणाऱ्या प्रत्येक बसेवर तुफान दगडफेक करत अनेक बसेसची जाळपोळ केली. दरम्यान आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला. सध्या चाकणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

काही वेळाने आक्रमक आंदोलकांनी २५-३० बसेस जळताच लोकांमध्ये खूप धावपळ झाली आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीमारही केला. त्यामुळे सध्या सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणते पाऊल उचलणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यावर केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले…

News Desk

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”, शालिनी ठाकरेंचा सवाल

Jui Jadhav

स्वबळावर सर्व निवडणुका जिंकण्यासाठी संघटन मजबूत करणे हाच संकल्प !

News Desk