HW News Marathi
मुंबई

भाजप ही सिंहाची पार्टी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | “२०१४मध्ये मोदींनी ज्यांची दुकानदारी बंदी केली, असे बेरोजगार आता एकत्र येऊन मोदी विरोधात एकत्र लढणार आहेत. हेच लोक एकमेकांना विरोधात लढणारे लोक आहेत. पण, शिकार दिसली की, जसे लांडगे शिकारीसाठी एकत्र येतात. तसे हे सर्व लांडगे सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र येत आहे. पण, ही सिंहाची पार्टी आहे. कितीही लांडगे एकत्र आले तरी सिंहाशी हे लांडगे लढू शकणार नाही.” विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी टीकेची झोड उठवली.

‘येत्या काळात सत्तेसाठी दंगली देखील होतील. समाजात जातीय तेढ निर्माण करतील. संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पवार साहेब तुमची नेमकी भूमिका काय आहे,’ असा उलटा सवाल फडणवीस यांनी शरद पवार यांना विचारला आहे. ‘हे किती ही लांडगे एकत्रित आले, तरी २०१९ लाल किल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी यावेळी बोलत होते.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी विरोधकांवर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

म्हाडाच्या घरांची १६ डिसेंबरला लॉटरी सोडत

swarit

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

News Desk

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

News Desk
मुंबई

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

मुंबई | ‘हल्ला बोल यात्रा’ नसून ही ‘डल्ला मार यात्रा’, ‘देशात सत्ता असताना ज्यांनी ‘डल्ला मारला’ तेच लोक आता ‘हल्ला बोल’ यात्रा काढली आहे’, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार केला आहे. भविष्यात हे लांडगे जातीय दंगली घडवण्याची भिती यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवली.

तुम्ही सत्तेत असताना आरक्षण का नाही दिले, आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण द्यावे आणि दुसऱ्या दिवशी बोलतात की, शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावे,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Related posts

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

News Desk

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण

News Desk

विद्याविहार स्थानकाजवळ अपघात, दोन जण जखमी

News Desk