HW News Marathi
महाराष्ट्र

कंटेनमेंट कृती आराखड्यामूळे कोरोनाबाधितांच्या आकड्यातील दुप्पट होणारा वेग घटला

मुंबई | न दिसणाऱ्या या कोरानाच्या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही कोरोनाने हाहाकार घातला आहेच. दरम्यान, महाराष्ट्रात कंटेनमेंट कृती आराखड्याची कठोर अमंलबजावणी होत असल्याने कोरोनाबाधिताच्या दुपट होणाऱ्या दराचा वेग कमी झाला आहे. याबद्दल काल (१६ एप्रिल) राज्याचे आरोग्यमंत्री राजश टोपे यांनीही माहिती दिली होती.

महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा दुपटीचा दर हा २ दिवसांचा होता. मात्र, राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणीनंतर हा वेग २ दिवसांवरून ६ दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जितका वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असणार, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक आहे. त्यातील ८३ ट्कके मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यांमुळे झाले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठी तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाणार आहे.

या समितीतील तज्ज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना देण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत झाल्या आहेत. तसेच, या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण हे कोविड-१९ पॉझॣटिव्ह आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB विरोधात खळबळजनक दावे; मलिक म्हणाले, “मी आता…”

News Desk

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांबाबत उच्च न्यायालयाची आता थेट केंद्र सरकारला विचारणा

News Desk

सोलापूरचा जवान भोजलिंग काळेल शहीद

News Desk