HW News Marathi
मुंबई

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

जळगाव | शुक्रवारी जळगावातील जैन हिल्सवर आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार उच्च कृषितंत्र पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना आमदार खडसे यांचे आगमन झाले होते. त्यानंतर शरद पवार भाषण करून परत येत असताना खडसे उठून उभे राहिले.

जाहीर कार्यक्रमात भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी शरद पवार यांना व्यासपीठावरच वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. त्याठिकाणी भाजपचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे यावेळी जे खडसेंना सुचलं ते इतर नेत्यांना का सुचलं नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय.

याच कार्यक्रमानंतर शरद पवार आणि खडसे यांच्यात एकातांत 10 मिनिटे चर्चाही झालीय.या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दानवेंची ईडीमार्फत चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

News Desk

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk

राज्यातले सरकार नथुरामाच्या विचाराचे: सचिन सावंत

News Desk
मुंबई

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

News Desk

मुंबई | ‘कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलांना सीबीएसईच्या फेरपरीक्षेला बसवू नका,’ असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील पालकांना केले आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्च तर बारावीचा २७ मार्चला घेण्यात आला होता. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा विचार बोर्डाने घेतला आहे.

सीबीएसईने बारावी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकादा २५ एप्रिल होणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. हा पेपर फक्त दिल्ली आणि हरियाणात होणार आहे. सीबीएसईचा दहावी पेपर फुटीप्रकरणात पोलिस तापस सुरू असून येत्या १५ दिवसात फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही, असे स्पष्टीकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले आहे.

‘सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच फुटला. हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वत:ची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात? सरकारला जर गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांना काय दोष, त्यांनी पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला का बसायचे?’ असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

पेण अर्बन बँकेतील ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांचा ‘वर्षा’वर धडक मोर्चा

News Desk

महापालिका शाळेतील गरीब, गरजवंत व कर्तबगार विद्यार्थ्यांची परदेश वारी

News Desk